निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:
माणसांच्या स्थलांतर वरून उठलेले वादळ देशात अजूनही शमलेली नाही, तोच आता वाघांच्या स्थलांतराचे नवे आव्हान आपल्यापुढे उभे ठाकले आहे. वाघांच्या या स्थलांतरात मागची कारणे अर्थातच वेगवेगळी आहेत. पण त्या प्रत्येक कारणात 'माणूस' नावाचा प्राणी आहे, हे मात्र नक्की! आणि या माणसामुळेच स्थलांतराला दरम्यान वाघांचे आयुष्य धोक्यात आले आहे.
अलीकडच्या काही काळात वाघांच्या स्थलांतरा च्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. अर्थातच 'रेडिओ कॉलर' मुळे त्यांच्या स्थलांतराचा मागोवा घेता येऊ लागला आहे. हे स्थलांतर आधीच होत होतेच. पण मोजक्या घटना वगळता योग्य यंत्रणा अभावी ते समोर येऊ शकले नव्हते. तेव्हाही वाघांसाठी स्थलांतरण धोकादायक ठरत होते आणि आज अत्याधुनिक यंत्रणा असतानाही त्यांच्या करता ते धोक्याचे ठरते आहे. दिवसेंदिवस वाघांचा अधिवास कमी कमी होत चालला आहे. कधी माणसाच्या आदिवासासाठी, तर कधी माणसाच्या व्यावसायिक कारणांसाठी व्याघ्र अधिवासाचा बळी दिला जात आहे. अशावेळी हा प्राणी जंगला बाहेर पडणार नाही तर काय? या देशाच्या विकासाचा मार्ग जंगलातूनच जातो. नवे राष्ट्रीय महामार्ग तसेच त्यांच्या विस्तारासाठी सर्रास कापले जंगल कापले जाते. अलीकडच्या काळात तर जंगल हे वन्यप्राण्यांसाठी नाही तर खाणींसाठी असल्यागत खाणींना परवानगी दिली जाते अशा वेळी वाघ नवीन अधिवासाच्या शोधात स्थलांतर करणार नाही तर काय? या स्थलांतरात अहि त्याच्यामागे अडथळे आहेतच. कधी त्याला राष्ट्रीय महामार्ग ओलांडावे लागतात, कधी रेल्वेमार्ग तर कधी कालवे. आणि अशावेळी अपघाती मृत्यूला त्याला कधी कधी सामोरे जावे लागते, नाहीतर शिकारीला! गेल्या काही वर्षात 'रेडिओ कॉलर' ही यंत्रणा वनखात्याने वापरायला सुरुवात केली आहे. पण या यंत्रणेचा वापर करण्यात आलेले वाघही जेव्हा शिकारीचे बळी होतात तेव्हा याचा यंत्रणेवर तरी विश्वास कसा ठेवायचा?
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून उमरेड-कऱ्हांडला स्थलांतर करून आलेल्या जय नामक वाघाचे काय झाले, हे सर्वांनाच माहीत आहे. साधारण दोन वर्षे वयाचे होईपर्यंत वाघ शिकारीला नीट सरावलेले नसतात. व्याघ्र प्रकल्पात असताना या वाघाने अवघ्या दीड वर्षाचा असताना रानगव्याची शिकार केली त्यानंतर कित्येकदा लोकांना राष्ट्रीय महामार्गावर दिसून आला. पाळीव जनावरे खाऊन धष्टपुष्ट झालेल्या या वाघाने अवघ्या जगाचे लक्ष वेधले. उमरेड-कऱ्हांड या अभयारण्यात आल्यानंतर तो शिकारीला बळी पडू शकतो ही शक्यता लक्षात घेऊन त्याला रेडिओ कॉलर लावण्यात आली मात्र काही महिन्यातच ही यशस्वी ठरली नाही. दुसऱ्यांदा त्याला पुन्हा रेडिओ कॉलर लावण्यात आली तीदेखील अयशस्वी ठरली. स्थलांतराचा त्याचा वेग लक्षात घेऊन त्याच्या संरक्षणासाठी लावलेली अत्याधुनिक यंत्रणा ही तपशील अयशस्वी ठरली, आणि शेवटी त्याचा बळी गेला. 2016 मध्ये उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील बिट्ट आणि श्रीनिवास या 2 वाघांना रेडिओ कॉलर लावली गेली त्यातील श्रीनिवास हा वाघ विजेच्या धक्क्याने मुळे मृत्युमुखी पडला.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघाचा आतापर्यंत 1600 ते 1700 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आणि अजूनही ते सुरूच आहे. एका स्थलांतरीत वाघाच्या उत्तम पद्धतीने होणाऱ्या संनियंत्रणाची महाराष्ट्रातील ही एकमेव घटना असावी. ऑक्टोबर 2019 मध्ये तेलंगणातील वाघ 450 किलोमीटरचे अंतर पार करून गडचिरोली जिल्ह्यात पोचला 2008 मध्ये मध्यप्रदेशातील कान्हा वाघ्र प्रकल्पातून 250 किलोमीटर अंतर पार करून एक वाघीण महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पोचली. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाचा प्रिन्स अशी ओळख असलेला वाघ 80 किलोमीटरचा प्रवास करत भंडारा जिल्ह्यात येऊन पोहोचला. आणि याच जिल्ह्यातील न्यू नागझिरा अभयारण्यातील कानी या नावाने ओळखली जाणारी वाघीण 70 किलोमीटर फिरून नवेगाव अभयारण्यात पोचली स्थलांतराच्या या केवळ समोर आलेल्या घटना आहेत यातील किती स्थलांतर आणि वन्यजीव अभ्यासकांनी मुळेच लक्षात आली आहेत.