Comprehension Passage
परिश्रम हे यशाचे जगातील सर्वोत्तम साधन आहे. आपल्या सर्व महत्त्वाकांक्षांची पूर्तता परिश्रमातूनच करता येते. जग हे कर्मक्षेत्र आहे, त्यामुळे कर्म करणे हाच आपला धर्म आहे. कोणत्याही कामात परिश्रम केल्यानेच यश प्राप्त होते. परिश्रमामुळेच जीवनाला गतिमानता प्राप्त होते. जर आपण कामाची हेळसांड केली तर जीवनाचा वेग मंदावेल. आळशीपणामुळे आपण अशा आवर्तात सापडतो की त्यातून सुटका होणे कठीण होऊन जाते उलट परिश्रमी माणूस सर्व अडचणींवर मात करतो आणि चौफेर यश प्राप्त करतो. परिश्रम करणारा प्रारब्धाचा विचार न करता सतत कसून काम करीत असतो. एखाद्या प्रसंगी त्याला परिश्रम करुनही यश प्राप्त झाले नाही तरी तो निराश न होता अपयशाच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यातील उणिवांवर मात करून यश संपादन करण्याचा प्रयत्न करतो. या जगात आपल्याला प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो. आणि त्यातूनच मार्ग काढावा लागतो. आपण कितीही सक्षम व साधन-संपन्न असलो तरी कठोर परिश्रम केल्याशिवाय आपणांस यश प्राप्त होऊ शकणार नाही. जगातील सर्व महापुरुषांच्या यशाच्या मुळाशी त्यांनी केलेले श्रम आणि क्षमता हेच आहे.
आपल्या समाजात अनेक माणसे दैववादी किंवा भाग्यवादी आहेत. अशी माणसे समाजोन्नतीत बाधा ठरतात. दैववादी माणसाने जगात कोणतेही महान कार्य केल्याचे आढळत नाही. शोध, नाविन्यपूर्ण शोध आणि नवनिर्माण हे फक्त परिश्रमाची फलश्रुती आहे. आपल्याकडील संसाधने आणि प्रतिभा ही आपल्याला मार्गस्थ करणारी उत्प्रेरक आहेत. पण कठोर परिश्रम आपणास यश साध्य करण्यास मदत करते. परिश्रमातूनच यश नि वैभव प्राप्त करता येते. आपण जेव्हा परिश्रमपूर्वक कर्तव्यपूर्ती करतो तेव्हा आपणास अतीव समाधान प्राप्त होते. अंतर्मनातील मलीनता नाहीशी होऊन अत्यंत समाधान लाभते. परिश्रम करणाऱ्या व्यक्तीला कोणतेही कर्मकांड महत्त्वाचे नसते. कर्तव्यपथावर वाटचाल करणे हेच त्याचे ध्येय असते. एखादा शेतकरी दिवसभराच्या परिश्रमानंतर संध्याकाळी जेव्हां आपल्या झोपडीत एखादे लोकगीत गातो तेव्हां त्याच्या स्वरलहरीतून जणू अलौकिक संगीत पाझरते. शारीरिक श्रम केल्याने समाधान तर लाभतेच शिवाय शरीरही निरोगी राहते. शारीरिक श्रम न केल्यामुळेच आजकाल माणसे अनेक प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहेत. शारीरिक श्रम प्रत्येकासाठी आवश्यकच आहे. शारीरिक श्रम करणारी माणसे दीर्घायुष्यी असतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. असेही म्हटले जाते की निरोगी शरीरातच निरोगी मन राहते. निरोगी माणसाला गंभीर गोष्टींचेही सहज आकलन होते. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तो न घाबरता त्याला सामोरे जातो आणि सर्व अडचणींवर मात करतो. मानसिक श्रमाचे महत्त्व कळल्यामुळेच आपले ऋषी-मुनी ध्यानस्थ राहत असत नि जगाच्या कल्याणाचा विचार करीत असत. परिश्रम या शब्दाला एक वेगळी अर्थच्छटाही आहे. यादृष्टीने श्रम हे उत्पादकही आहे नि अनुत्पादकही आहे. शेतकरी शेतात परिश्रम करतो ते उत्पादक श्रम परंतु मैदानी खेळात केलेले श्रम किंवा व्यायाम याला अनुत्पादक श्रम म्हणता येईल. असे असले तरी अशा श्रमाचेही महत्त्व आहेच. गांधीजींनी म्हटले आहे की जर श्रमच करायचे आहे तर उत्पादक श्रम का करु नये? म्हणजेच गांधीजी प्रत्येक प्रकारच्या श्रमातून आनंद अनुभवीत असे. ज्या राष्ट्रांची प्रजा परिश्रमी असते तीच राष्ट्रे उन्नती करतात. महायुध्दांचे भीषण परिणाम भोगावे लागल्यानंतरही जपान आणि जर्मनी या देशांनी आपल्या देशाची ज्या प्रकारे उभारणी केली ते कठोर परिश्रमामुळेच शक्य झाले. शेवटी असे म्हणता येते की कठोर परिश्रम हे आयुष्यातील समाधानाचा आणि नवनवोन्मेषाचा मूलमंत्र आहे.
आपल्या समाजात अनेक माणसे दैववादी किंवा भाग्यवादी आहेत. अशी माणसे समाजोन्नतीत बाधा ठरतात. दैववादी माणसाने जगात कोणतेही महान कार्य केल्याचे आढळत नाही. शोध, नाविन्यपूर्ण शोध आणि नवनिर्माण हे फक्त परिश्रमाची फलश्रुती आहे. आपल्याकडील संसाधने आणि प्रतिभा ही आपल्याला मार्गस्थ करणारी उत्प्रेरक आहेत. पण कठोर परिश्रम आपणास यश साध्य करण्यास मदत करते. परिश्रमातूनच यश नि वैभव प्राप्त करता येते. आपण जेव्हा परिश्रमपूर्वक कर्तव्यपूर्ती करतो तेव्हा आपणास अतीव समाधान प्राप्त होते. अंतर्मनातील मलीनता नाहीशी होऊन अत्यंत समाधान लाभते. परिश्रम करणाऱ्या व्यक्तीला कोणतेही कर्मकांड महत्त्वाचे नसते. कर्तव्यपथावर वाटचाल करणे हेच त्याचे ध्येय असते. एखादा शेतकरी दिवसभराच्या परिश्रमानंतर संध्याकाळी जेव्हां आपल्या झोपडीत एखादे लोकगीत गातो तेव्हां त्याच्या स्वरलहरीतून जणू अलौकिक संगीत पाझरते. शारीरिक श्रम केल्याने समाधान तर लाभतेच शिवाय शरीरही निरोगी राहते. शारीरिक श्रम न केल्यामुळेच आजकाल माणसे अनेक प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहेत. शारीरिक श्रम प्रत्येकासाठी आवश्यकच आहे. शारीरिक श्रम करणारी माणसे दीर्घायुष्यी असतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. असेही म्हटले जाते की निरोगी शरीरातच निरोगी मन राहते. निरोगी माणसाला गंभीर गोष्टींचेही सहज आकलन होते. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तो न घाबरता त्याला सामोरे जातो आणि सर्व अडचणींवर मात करतो. मानसिक श्रमाचे महत्त्व कळल्यामुळेच आपले ऋषी-मुनी ध्यानस्थ राहत असत नि जगाच्या कल्याणाचा विचार करीत असत. परिश्रम या शब्दाला एक वेगळी अर्थच्छटाही आहे. यादृष्टीने श्रम हे उत्पादकही आहे नि अनुत्पादकही आहे. शेतकरी शेतात परिश्रम करतो ते उत्पादक श्रम परंतु मैदानी खेळात केलेले श्रम किंवा व्यायाम याला अनुत्पादक श्रम म्हणता येईल. असे असले तरी अशा श्रमाचेही महत्त्व आहेच. गांधीजींनी म्हटले आहे की जर श्रमच करायचे आहे तर उत्पादक श्रम का करु नये? म्हणजेच गांधीजी प्रत्येक प्रकारच्या श्रमातून आनंद अनुभवीत असे. ज्या राष्ट्रांची प्रजा परिश्रमी असते तीच राष्ट्रे उन्नती करतात. महायुध्दांचे भीषण परिणाम भोगावे लागल्यानंतरही जपान आणि जर्मनी या देशांनी आपल्या देशाची ज्या प्रकारे उभारणी केली ते कठोर परिश्रमामुळेच शक्य झाले. शेवटी असे म्हणता येते की कठोर परिश्रम हे आयुष्यातील समाधानाचा आणि नवनवोन्मेषाचा मूलमंत्र आहे.
प्रस्तुत पर्यायांपैकी उत्पादक श्रम याबाबतीत आलेले अयोग्य विधान कोणते?
1
उत्पादक श्रमाला महात्मा गांधींनी चालना दिली
2
उत्पादक श्रमामुळे राष्ट्रांची उन्नती खुंटते
3
श्रम जसे उत्पादक आहेत तसेच ते अनुत्पादक ही आहेत
4
शेतकरी शेतात परिश्रम करतो ते उत्पादक श्रम होय