खालील परिच्छेद वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या
भारतातील दलित चळवळ अद्याप मोठ्या प्रमाणात सर्वसाधारण मतैक्याने तयार झालेली नाही. हे विविध रूपे, आकार आणि स्वरूपांमध्ये असते. राजकीयदृष्ट्या पुराणमतवादी दलितांना व्यापक भारतीय लोकशाही अनुभवात आणण्यासाठी त्यांनी अद्याप ठोस कार्यक्रम तयार केलेला नाही. आंबेडकरवाद किंवा दलितवादाचा एक कार्यक्षम सिद्धांत तयार करण्यासाठी दलित विद्वान आणि राजकारणी एकसमान धडपडताना दिसू शकतात जो सामान्य मुक्तीचा जाहीरनामा असेल.
मुक्तीचे साधन म्हणून केवळ संविधानवादावर विसंबून राहून विचारवंतांचा हा वर्ग युटोपियन स्वप्नासाठी युक्तिवाद करतो, तथापि दलितमुक्तीच्या पद्धती अज्ञात आहेत. भारतातील अत्याचारितांना हे जितक्या लवकर कळेल तितके चांगले. सुटकेसाठी संविधानवादाच्या मर्यादित संकल्पनांवर अवलंबून राहू शकत नाही. या संस्थेच्या मर्यादित नियंत्रणामुळे, संविधान हे तत्काळ निराकरण न करणाऱ्या तक्रार कक्षाचे समानार्थी बनले आहे.
संविधानाची भाषिक सुलभता आणि शोषितांपर्यंत त्याची पोहोच अत्यंत मर्यादित आहे. काही शेतकरी राज्यघटनेला एक लेखी शब्द मानतील जे त्यांना जमीनदाराच्या वास्तविक आणि आर्थिक चाबकापासून संरक्षणाची हमी देईल. त्याचप्रमाणे, काही भिक्षेकरी जे देणगीदारांच्या कृपेवर जगत आहेत त्यांना असे वाटेल की हे देणगीदार त्यांना समानता आणि स्वातंत्र्याची हमी देतील. संविधानाची कल्पना प्रणयरम्य आहे. कोणालाच त्याच्या मर्यादा खरोखरच माहीत नाहीत परंतु त्याची चाचणी न घेता त्याच्या प्रगल्भतेचे कौतुक केले जाते. अनेक दलित राज्याच्या संविधानवादाचे वर्णन देवाने पाठवलेला रामबाण उपाय असा वारंवार करत आहेत. एखाद्याच्या भग्न झालेल्या अहंकाराची मालिश करण्यासाठी मलम लावण्यापलीकडे ते काही करत नाही. पण जेव्हा संविधानातील अंतर्निहित नियमांचा वापर करण्याची वेळ येते, तेव्हा दलितांना त्यांच्या स्वाभिमानाची हानी होताना दिसते. कारण हा दस्तऐवज आपल्या हृदयाच्या जवळ आहे असे दलितांएवढे कोणालाही वाटत नाही. संविधानाकडून प्रत्येकाच्या समान अपेक्षा नाहीत. अशाप्रकारे, घटनात्मक नैतिकतेला एक सामान्य सद्गुण मानत ते वास्तविक अंतर निर्माण करते. म्हणूनच, अशा एकतर्फी लागू असलेल्या परिस्थितीत, परस्पर सहवास हे एक दूर दृश्य आहे. परस्परता आणि आदराचा सूर स्थापित करण्यासाठी जहाल उतारा टोचून जातीवादी बदमाशांच्या कुटिल अजेंड्याला छेद द्यावा लागतो. जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत वास्तविक परिणाम देणार्या कोणत्याही पुढील संभाषणाचा अंदाज येऊ शकत नाही. [सूरज येंगडे, कास्ट मॅटर्स मधून घेतलेला]