खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खालील माहितीचा अभ्यास करा.
एक आस्थापना तरुण व्यावसायिकांना कामावर घेऊ इच्छिते. येथे कोणतेही पदवीधर उमेदवार या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. परंतु आस्थापनेने काही पात्रता निकष निर्धारित केले आहेत. ज्यात दोन फेऱ्या आहेत, पहिल्या फेरीत अभियोग्यता चाचणी आणि दुसऱ्या फेरीत वैयक्तिक मुलाखत असेल.
1) कोणताही अनुशेष (बॅकलॉग) नसलेला विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र असेल.
2) विद्यार्थ्याला 10 वी आणि 12 वी मध्ये किमान 68 टक्के असणे आवश्यक आहे.
3) पदवीमध्ये 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी कोणत्याही अनुशेषाशिवाय थेट मुलाखत फेरीसाठी पात्र असतील.
1 ला किंवा 2 रा निकष पूर्ण न झाल्यास,
1) उमेदवाराला कोणत्याही क्षेत्रात 1 वर्ष कामाचा अनुभव असल्यास तो योग्यता फेरीत सहभागी होण्यास पात्र असेल. परंतु उमेदवाराने त्याचे अनुशेष दूर केले नसल्यास तो यात सहभागी होण्यास पात्र ठरणार नाही.
वाणिज्य शाखेतील अमित या एका विद्यार्थ्याला 10 वी आणि 12 वी मध्ये 69 टक्के गुण मिळाले आहेत. तो सध्या एका आयटी कंपनीत 15 महिन्यांपासून काम करत आहे. पदवीमध्ये त्याने केवळ 65 टक्के गुण मिळवले असून त्याने अनुशेष देखील पूर्ण केला आहे.