शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या निवडीचे निकष खालीलप्रमाणे आहेत. विद्यार्थ्यांना हे आवश्यक हवे:
A. लेखी परीक्षेत किमान 65% गुण मिळायला हवे.
B. 1 जानेवारी 2021 रोजी 13 वर्षांपेक्षा कमी आणि 17 वर्षांपेक्षा जास्त वय नसावे.
C. सलग तीन वर्गात कमीतकमी 80% गुण मिळवले असावे.
वर नमूद केलेल्या निकषांच्या आधारे आणि कोणतीही अतिरिक्त माहिती गृहीत न धरता दिलेल्या उमेदवाराच्या प्रोफाइलसाठी निर्णय घ्यावा.
ज्ञानू दहावीला आहे. त्याने वर्गात नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्याने आठवीत 75 टक्के गुण मिळवले. त्याचा जन्म 17 जुलै 2005 रोजी झाला. मेहनती विद्यार्थी असल्याने त्याने लेखी परीक्षेत 70% गुण मिळवले.
1
ज्ञानूला आठवीत 75 टक्के गुण मिळाल्याने त्याची निवड होणार नाही.
2
लेखी परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने ज्ञानूची निवड होणार आहे.
3
ज्ञानू हा वर्गातील हुशार विद्यार्थी असल्याने त्याची निवड करण्यात येणार आहे.
4
ज्ञानू वयाचा निकष पूर्ण करत नसल्याने त्याची निवड होणार नाही.