एका विद्यापीठाच्या शिक्षण विभागात प्राध्यापक म्हणून व्यक्तींच्या भरतीसाठी खालील अटी आहेत.

उमेदवार:

a) 1 नोव्हेंबर 2013 रोजी, वयोमर्यादा 30 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

b) किमान दोन वर्षे अध्यापन कार्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

c) किमान 70% गुणांसह शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

d) मुलाखतीमध्ये 50 पैकी किमान 35 गुण मिळवणे आवश्यक आहे.

वरील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत,

e) त्याची/तिची विभागामध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात येईल.

f) शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर, ज्याला 70 टक्क्यांपेक्षा कमी पण 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले असतील तर त्याची सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात येईल.

g) 1 नोव्हेंबर 2013 रोजी, उमेदवाराचे वय 38 वर्षांपेक्षा अधिक परंतु 42 वर्षांपेक्षा कमी असल्यास, त्याचे प्रकरण विभाग प्रमुखाकडे पाठवण्यात येईल.

वरील अटी आणि प्रश्नातील प्रत्येक उमेदवाराविषयी दिलेल्या माहितीच्या आधारे, प्रत्येक उमेदवारासाठी खालीलपैकी कोणती कारवाई करावी हे आपल्याला ठरवायचे आहे. निर्णय, प्रदान केलेल्या माहितीवर आधारित असावा:

कीर्तीने 71% गुणांसह पदव्युत्तर पदवी (शिक्षणशास्त्र) मिळवली आहे, तिची जन्मतारीख 14 ऑगस्ट 1980 आहे. तिने 3 वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आहे आणि तिला मुलाखतीत 70 टक्के गुण मिळालेले आहेत.

1
उमेदवाराची प्राध्यापक म्हणून निवड केली जाईल.
2
उमेदवाराची सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड केली जाईल.
3
तिचे प्रकरण विभाग प्रमुखाकडे पाठवले जाईल.
4
उमेदवाराची निवड केली जाणार नाही. 

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation