भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मौद्रिक धोरणासंदर्भात पुढील विधानांचा विचार करा:
1. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 अंतर्गत मौद्रिक धोरण राबविण्याची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सोपविण्यात आली आहे.
2. विकासाचे उद्दीष्ट समोर ठेवून किंमत स्थिरता राखणे हे मौद्रिक धोरणाचे मुख्य उद्दीष्ट आहे.
3. केंद्र सरकारने 4 टक्के घाऊक किंमत निर्देशांक (WPI), चलनवाढीचे लक्ष्य म्हणून अधिसूचित केले आहे.
उपरोक्त कोणते/कोणती विधान/विधाने योग्य नाही/नाहीत?
1
केवळ 1 आणि 3
2
केवळ 2
3
केवळ 2 आणि 3
4
केवळ 3