पुढील उतारा वाचा आणि प्रश्नांसाठी योग्य पर्यायाची निवड करा:
निसर्गात फुलझाडे, पक्षी आणि कटिक यांचे अनोखे नाते आहे. परागीभवनासाठी पक्षी आणि कीटकांची मदत होते. त्यासाठी झाडे गोड मकरंदाची फुले आपल्या उपकारकर्त्याना देतात. मात्र हा खाऊ मिळवतानाच या मंडळींनी सोबत परागकण नक्की न्यावेत अशी फुलांचीही प्रामाणिक इच्छा असते. त्यासाठी ही फुलझाडे खात्रीशीर, प्रभावी युक्त्याही वापरतात.
माणसापेक्षा कितीतरी वेगवेगळ्या रंगच्छटा कीटक पाहू शकतात. मधमाश्यां-सारखे कीटक तर अतिनील प्रकाशातही सहज वावरू शकतात. त्याचा चांगला उपयोग उोंगरउतारावर, रस्त्याच्या कडेला फुलणारी छोटीशी पिवळी रानफुले करून घेतात. हीच पिवळी फुले मधमाश्यांना चक्क वेगळीच दिसतात. मधमाश्यांना अतिनील प्रकाशदृष्टीच्या देगणीमुळे या फुलांच्या पिवळ्या पाकळ्या पांढऱ्या दिसतात. तसेच, पाकळ्यांच्या कडांना व बाजूला निळसर जांभळा रंग दिसतो. पाकळ्यांच्या रंगातील बदल हा त्या फुलांनी, मधमाश्यांना संदेश देण्यासाठी वापरलेली छानशी युक्ती असते. यामुळे मधमाश्यांना मधुकोषाकडे अचूक जाण्याची योग्य दिशा सापडते. विशेष म्हणजे, या मार्गावरुन जाताना मधमाश्यांच्या शरीराला फुलातले परागकण हमखास चिकटतात. त्यामुळे परागीभवन खात्रीने होते.
“गिलीया' नावाची छोटी झुडुपे तर परागीभवन हमखास होण्यासाठी वेगळीच युक्ती लढवतात. ही झुडुपे त्यां फुलांचा रंग ठराविक काळानंतर चक्क बदलतात. उन्हाळ्याच्या सुरूवातीला त्यांना गडद लाल, केशरी रंगांची भरपूर फुले येतात. या लाल रंगाच्या फुलांकडे गुणगुणापक्षी आकर्षित होतात. विशेष म्हणजे या पक्ष्यांची चोच लांब व बाकदार असते. चोच मधापर्यंत नीट पोचण्यासाठी या फुलांच्या एकमेकींशी जोडून उभट पेल्यासारखा आकार धारण करतात. पर्यायाने गुणगुणापक्षी मध चोखताना, चोचीजवळच्या परागकण चिकटतात व परागीभवनाचे काम फत्ते होते. उन्हाळा संपला की त्याच झाडांना पांढर्या रंगाची फुले येतात. ऋतु बदलल्याने गुणगुणापक्ष्यांनी स्थलांतर केलेले असते, पण पतंगांचे आगमन झालेले असते. हे विशिष्ट प्रकारचे पतंग फुलांकडे आकर्षित होतात. निमित्ताने फुलांना भेट देतात व परागीभवनास मदत करतात.
'एकमेका साहाय्य करू, अवघे जीवन जगू' अशा उदात्त विचारांनीच निसर्गातले हे घटक आपले अस्तित्त्व टिकवून आहेत.