Comprehension Passage

पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायांची निवड करा.

मी झाड झालो तर निसर्गातील सर्व सजीवांना थंडगार सावली देण्याचे काम मी करेल. मी जर झाड झालो तर वन्य प्राणी पक्षी जसे माकड, खारुताई, सुतार पक्षी, पोपट माझ्या फांद्यावर येऊन बसतील. सध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात तुम्ही मला विसरला आहात. मी तुम्हाला आज माझे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सहलीला जाताना एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून वन भोजन करणे कोणाला आवडत नाही. पण रस्ते रुंदीकरणासाठी तुम्ही अशीच झाडे तोडत राहिलात तर असे अनुभव तुम्ही कसे घेऊ शकाल. वडाच्या पारंब्याना लटकणे, चोरून आंबे पाडणे, मोठ्या झाडाच्या फांदीला झूला झूलने, या साऱ्या आठवणींनी तुमचे बालपण सजले होते. पण ज्या प्रकारे वृक्षतोड होत आहे. पुढच्या पिढीला हे अनुभव कधीच अनुभवता येणार नाहीत आणि मग तुम्ही तक्रार करता की, आमची मुले दिवस रात्र विडिओ गेम्स खेळत बसतात. तुमच्या सारखे आम्ही सुद्धा जिवंत आहोत, आम्हालाही भावना आहेत. आम्हालाही वेदना होतात. तुमच्या मुलांना, प्रियजनांना थोडेसे खरचटले की तुमच्या मनाची घालमेल होते. पण झाडाच्या फांद्या तोडताना, फळांसाठी दगड मारताना, करवतीने, कुऱ्हाडीने वृक्षांना कापताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? डोळ्यात अश्रू नाही पण मनात एक साधा विचारही येत नाही, एवढे स्वार्थी कसे झालात तुम्ही?

झाडाझुडपांमुळे जमिनीची धूप कमी होते. झाडांची मुळे माती धरून ठेवतात. याने जमिनीचा पोत टिकून राहतो यामुळे कमीत कमी कृत्रिम, रासायनिक खतांच्या मदतीने चांगले पीक घेता येते. जर चांगली पिके आली तर गरीब शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही, त्याला आत्महत्या करावी लागणार नाही. आदिवासी, गावातील गरीब लोक जंगलातून फळे, फुले, रानमेवा आणून विकतात.त्यांच्यावर त्यांचे पोट भरते.झाडे तोडून, वणवे लावून तुम्ही त्यांच्या पोटावर पाय ठेवत आहात.

तुम्ही जंगलात वणवे लावता, हजारो छोटे मोठे प्राणी, पक्षी मारले जातात, त्यांना स्थलांतर करावे लागते. जर तुमचे घर कोणी विनाकारण पेटवून दिले तर तुम्हाला कसे वाटेल? या सर्वामुळे नकळत तुम्ही मानवी जीवनचक्र प्रभावित करत आहोत. तुम्ही स्वतःच्या हातांनी आपला विनाश लिहत आहात. अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही खूप झाडे तोडली आहेत, पर्यावरणाचा खूप ऱ्हास केला आहे. अजूनही तुम्ही केलेली चूक सुधारण्याची संधी आहे. आणखी एखादं दशक असेच चालू राहिले तर काहीच करता येणार नाही. आज जसे आपण बाटलीतून पाणी पितो तसे भविष्यात बाटलीतून श्वास घ्यावा लागेल. आपल्या नंतरची पिढी राजनीती आणि धर्मासाठी न लढता, पाणी आणि ऑक्सिजनसाठी एकमेकांचा जीव घेईल, तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला हाच वारस्सा द्यायला आहे का?

आम्हालाही वेदना होतात नि तुम्हालाही वेदना होतात. या वाक्यतील अधोरेखित शब्द काय आहेत?

1
सर्वनाम 
2
नाम 
3
विशेषण 
4
अलंकार 
5
यापैकी एकही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation