पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायांची निवड करा.
आपले दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे तरुणांना स्वप्ने पहाण्यास सांगत. त्यांचे म्हणणे होते हे स्वप्न पहातात तेच पूर्ण करण्याची ताकद ठेवतात आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवतात. कारण ती स्वप्नेच त ध्येयाप्रत नेवून सोडतात. तसे पाहिले तर स्वप्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहेत. त्यांना कुठल्याही वयोगटातील व्यक्ती असो स्वप्नांशी जोडल्या गेलेली असते. प्रत्येकाच्या मनात स्वप्नांची आपली अशी एक दुनिया असते. विश्व असते. आता त्यातील सगळीच स्वप्ने पूर्ण होतात असे नाही. पण म्हणून माणूस स्वप्न बघण्याचे थांबवतो असे मात्र नाही. मी तर म्हणेन ज्याला स्वप्न पडत नाही तो व्यक्ती किड्यामुंग्यांप्रमाणे अर्थहीन असे आयुष्य जगतो. कारण स्वप्नेच आपल्यात ध्येय, महत्वाकांक्षा, जिद्द, मेहेनत , चिकाटी, हे निर्माण करत असतात. आणि या सगळ्यांचा मुलामा माणसाच्या आयुष्याला नसेल तर त्याच्या जगण्याला काही अर्थ उरत नाही. कारण शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद, बळ ही स्वप्नेच पुरवतात. युवकांचे आयुष्य तर बालपणापासूनच स्वप्नांच्या बागेत एखाद्या फुलपाखराप्रमाणे विहरत असते. हळूहळू व यानुसार त्याच्या कक्षा मात्र रुंदावत जातात. स्वप्नांचे इंद्रधनू त्यांच्या आयुष्यात असते. परंतु आताची तरुण पिढी मात्र थोड्याश्याही अपयशाने आणि दुःखाने खचून जाणारी आहे असे आपण पाहतो. फुलांबरोबर काटेही असतात हे ते सोयीस्कररीत्या विसरतात. काही तरी मिळवण्यासाठी, आपले इप्सित ध्येय साध्य करण्यासाठी कळ ही सोसावीच लागते; हे मात्र त्यांच्या गावीही नसते. निसर्गातील प्रत्येक घटक नवीन, नूतन काही देण्यासाठी बदलाचे शर अंगावर झेलतो , लोणी तयार होण्यासाठी दह्या दुधाला जसे घुसळावे लागते , वृक्षाला नवी पालवी येण्यासाठी पानझड सोसावी लागते, सोन्याचा दागिना घडवताना त्याल का जसे तप्त ज्वालेचा सामना करावा लागतो, एक स्त्री जेव्हा आपल्या उदरात नवीन जीव ठेवते आणि असंख्य वेदना सहन करून पुन्हा जन्म घेते, त्याप्रमाणे काहीतरी साध्य करण्यासाठी झिजावे लागते. हे सूत्रच आज च्या तरुणांना ठाऊक नाही. त्यांना सगळे इन्स्टंट, ताबडतोब, आणि लगेच हवे असते. स्वामी विवेकानंद म्हणायचे आपल्या देशाचा तरुण युवकच सुयोग्य बदल घडवून आणण्याची ताकद आपल्य हात ठेवतो. त्यांच्यावर योग्य संस्कार झाल्यास परिपूर्ण, सर्वांगीण विकास झालेली पिढी जन्माला येईल आ णि तिच आपल्या देशाचे उज्वल भविष्य घडवील. पण आजचा युवक मात्र चुकीच्या, वाममार्गाला लागून ब ळी पडत चालला असल्याचे आपण पाहतो. उत्तम गुरु लाभल्याशिवाय त्याचे मार्गदर्शन मिळाल्याशिवाय त्याचा उद्धार होणे नाही. त्यासाठी युवकाने स्वप्न पाहणे गरजेचे आहे. स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी आपल्याला स्वप्ने पाहिले पाहिजेत.