Comprehension Passage
पुस्तके मेंदूसाठी उत्तम आहार आहेत. एका विचारवंताने म्हटले आहे की, मानवसमूहाने आत्तापर्यंत केलेला विचार, कृती आणि शोध पुस्तकांमधून जतन करुन ठेवले आहेत. मानवी सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीचे श्रेय पुस्तकांना जाते. त्यामुळेच पुस्तकांचे महत्त्व अतुलनीय आहे. पुस्तकाने आपले अंतःकरण उजळून निघते. उत्तम पुस्तके माणसाला असंस्कृतपणाकडून सुसंस्कृतपणाकडे नेतात, त्याच्यातील सात्त्विक भाव जागृत करुन त्याला पथभ्रष्ट होण्यापासून परावृत्त करतात आणि समाज व राष्ट्राचे मार्गदर्शन करतात. पुस्तके ही प्रेरणादायी असतात आणि त्यांचा आपल्या मन व बुद्धिवर दीर्घकालीन प्रभाव असतो. मनोरंजनाचे साधन म्हणूनही पुस्तकांकडे पाहिले जाते. इथे मनोरंजन या शब्दाचा अर्थ निव्वळ करमणूक नसून, तो अधिक गहन आहे. जी पुस्तके माणसाच्या अंतर्मनाला स्पर्श करतात, त्याच्या हृदयाला भिडतात तीच खऱ्या अर्थाने मनोरंजनप्रधान पुस्तके आहेत. अशी लक्षवेधी पुस्तके वाचकाला सुखावत असतात. यादृष्टीने हलके-फुलके साहित्यदेखील कमी महत्त्वाचे नसते. असे साहित्य मोठ्याप्रमाणात माणसांचा ताण कमी करतात. आणि त्यांना नैराश्यातून बाहेर काढतात. उत्तम पुस्तके माणसाच्या ज्ञानवर्धानाचे आणि आनंदाचे साधन आहे विज्ञान, वाणिज्य, कला आणि न्यायशास्त्रावरील पुस्तकांनी माणसाच्या ज्ञानात मोलाची भर घातली आहे. पुस्तकांच्या वाचनातून माणसाला एकप्रकारचे आत्मबल प्राप्त होते. पुस्तके खऱ्या अर्थाने आपले मार्गदर्शन करतात. पुस्तके ज्ञानवर्धन करतात, नवनवीन रहस्ये उलगडून दाखवितात आणि चिंतन-मनन करण्यासही प्रवृत्त करतात. पुस्तके आपल्याला द्विधामनस्थितीतून बाहेर काढतात व सक्षम बनवितात. गांधीजींनी गीतेला आई म्हटले आहे. कारण प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांना गीतेतून मार्गदर्शन लाभले होते. पुस्तक हे एखाद्या शिक्षकाप्रमाणे कधी रागावत नसते, शिक्षा करीत नसते किंवा मोबदल्यात काहीही मागत नसते. उलट अक्षरत्त्वाचे सत्त्व बहाल करते. पुस्तके माणसाला सुख देतात. पुस्तकात रमणारा माणूस सहसा नैराश्यात सापडत नाही किंवा रितेपणा अनुभवत नाही. वैचारिक संघर्षात पुस्तके उत्तम आयुध ठरतात. पुस्तकातील विचारांमध्ये संपूर्ण समाजाला बदलण्याचे सामर्थ्य असते. सध्याचे जग हे विचारांचे जग आहे. समाजात होणारे बदल किंवा क्रांती यांची सुरुवात विचारधारेतूनच होत असते.

हलके-फुलके साहित्याबद्दल कोणते विधान अयोग्य आहे?

1
हलके-फुलके साहित्य मोठ्या प्रमाणात माणसांचा ताण कमी करतात.
2
हलके-फुलके साहित्य कमी महत्त्वाचे नसते.
3
असे साहित्य माणसाला नैराश्यातून बाहेर काढतात.
4
पुस्तके माणसाला सुख देतात.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation