खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांच उत्तर द्या.

भारतीय लोक नदीला माते समान मानतात. गोदावरी ही भारताची दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची नदी आहे. गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील सहयाद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रह्मगिरी येथे झाला. गोदावरी ही गंगेची आद्य बहीण आहे. भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतरण्याचा अगोदर गोदावरीचा उगम झाला होता. त्यामुळे तिला दक्षिण गंगा नावानेही ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर पासून पुढे वाहतांना गोदावरीचा प्रवाह गुप्त होतो. 20-25 किमीचा प्रवास करून गोदावरी नाशिक शहरात प्रवेश करते. महाराष्ट्रामधून वाहतांना गोदावरी नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्हातून वाहत जवळ - जवळ 950 किमीचा प्रवास करून आंध्रप्रदेश मध्ये प्रवेश करते. इंद्रावती, वैनगंगा, पेनगंगा, मांजरा, प्राणहिता, दारणा, प्रवरा, या गोदावरीच्या प्रमुख उपनद्या आहेत. गोदावरी ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी व जीवनदायिनी आहे. गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे 50% हून अधिक क्षेत्र व्यापले आहे आणि त्यांस सुजलाम-सुफलाम केले आहे. गोदावरीच्या खोऱ्यात काही दिवसांपूर्वी खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. एकूणच धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक दृष्टया गोदामाईचे लोकांमध्ये विशेष स्थान आहे.

उतारा वाचून सांगा की गोदावरीचा प्रवाह कुठे गुप्त होतो? 

1
नाशिक जवळ
2
नांदेड जवळ
3
त्र्यंबकेश्वर जवळ
4
औरंगाबाद जवळ

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation