Comprehension Passage
पुढील उतरा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायांची निवड करा.
सर्वसामान्य माणसाला मातीशी इमान राखत इमानेइतबारे कष्ट करूनच जगावे लागले. आजही या स्थितीत बदल झालेला आहे, असे म्हणता येणार नाही. आधुनिक जीवनशैलीमुळे जगण्याचे संदर्भ पूर्णतः बदलतातच असेही नाही. या मातीशी निगडित असलेल्या प्रत्येक कणाशी लोकमानसाची नाळ जुळलेली आहे. त्याच्या जीवनजाणिवात या सर्वच संदार्भाना महत्त्वपूर्ण असे स्थान आहे. कष्ट करून जगण्याची दिवसभरापासूनची त्यांची कृती ही बुद्धिकौशल्याची, सृजनत्वाची साक्ष पटविणारीच आहे. दैनंदिन जीवन व्यवहारातील लोकमानसाच्या वापरत असलेल्या वस्तूवरून नजर फिरवली तरीही हे सहजपणाने लक्षात येते. बांबूच्या वेळांपासून तयार करण्यात येणाऱ्या असंख्य वस्तूंनी तर यांचे जीवन व्यवहार व्यापलेले आहेतच. त्याबरोबरीने त्या त्या प्रत्येक वस्तूंशी त्यांचे सख्यच जुळलेले आहे. बांबूच्या वेळांपासून तयार करण्यात येणारी 'टोपली' ही घराघरांतील कष्टकरी स्त्रियांची सखी सहचारिणीच होती.
आकाराला हडगी, हडगो म्हणण्यात यायचे. टोपली, टोपलो, पाटलो अशीही नावे यांच्याशी रूढ आहेत. कृषिप्रधान संस्कृतीत टोपलीला अनन्यसाधारण महत्त्व होते. घरात, शेतात, सण विधीत या टोपलीशिवाय पानही हलत नसायचे. घरातील शेतभाटातील तिचा वावर हा अपरिहार्यच होता. टोपलीला कधी कंबरेवर तर जास्त डोक्यावर बसवूनच घरातील स्त्री आपला कार्यभाग आटपून घ्यायची. पाटलो किंवा टोपली ही पाच कुडो धान्य मावेल अशी बनवली जायची, मात्र हडगी निदान दहा टोपली धान्य मावणारी बनवली जायची. टोपलीपेक्षा हडगी मोठी पसरट. कमी उंचीची धान्य जास्त मावणारी. जास्त करून नाचण्याची कणसे पिकल्यानंतर ती कापून हडगीत भरून खळ्यावर सुकत घालण्यासाठी आणली जायची. त्याचप्रमाणे केळीचे घड मग कधी ते पिकलेले तर कच्चेच असलेले विक्रीसाठी बाजारात न्यायचे असतील तर त्याचबरोबरीने पपई, चिबूड यांची विक्री बाजारात करण्यासाठी प्रामुख्याने हडगीचाही वापर केला जायचा. हडगी आकाराने मोठी असल्याकारणाने व बेळाची रचना पोकळ तऱ्हेने म्हणजेच मध्ये मोठे चौकोन ठेवून केल्याकारणाने बाकीच्या धान्यासाठी ती उपयोगी पडत नसायची. टोपली मात्र गच्च विणली जायची. त्याशिवाय ती शेणाने सारवून तिची लहानसहान उरलेली छिद्रेही बुजून जायची. त्यामुळे खळ्यावर सुकत घातलेले धान्य मग ते नाचणी, वरी, भात का असेना यांची ने आण करण्यासाठी सोपे जायचे. शेणाने सारवलेली असल्याकारणाने टोपलीतील धान्य खाली सांडत नसे. टोपली सारवण्यासाठी शेणात मीठही घातले जायचे. त्यामुळे ती टिकवूही व्हायची. शिवाय या बेळांच्या व्यवस्थित बरड न लागता राहायला हव्यात म्हणून चुलीच्या वर टांगल्या जायच्या. जेणेकरून धुराच्या उबेमुळे या वस्तूंचे आयुष्य वाढायचे. भात उकडल्यानंतर मात्र ते मडकीतून टोपलीत काढताना शेणामिठाने सारवलेली टोपली वापरत नसायचे. मातीतील पाणी निथळून जाण्यासाठी या टोपलीचा वापर महत्त्वपूर्ण असाच होता. त्याशिवाय पिकलेली मिरची रोपट्यावरून काढून ती टोपलीतच एकत्रीत केली जायची. ती सुकविण्यासाठीही टोपलीचाच वापर व्हायचा. शेतासाठी सुके शेण, गोबर टोपलीतूनच नेले जायचे. त्याचप्रमाणे लग्नप्रसंगातील विविध विधीप्रसंगी मग ते करे ठेवण्यासाठी असू दे नाहीतर शिजवलेला भात उपसण्यासाठी असो ही टोपलीच मदतीला यायची. छोट्या मोठ्या टोपल्या विणूनही त्याचा वापर सर्रासपणे घराघरात केला जायचा.

मातीशी संबंधित प्रत्येक घटकाशी कोणाचे नाते घट्ट जुळलेले असते?

1
टोपली
2
हडगी
3
लोकमानस
4
बांबू
5
यापैकी एकही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation