Comprehension Passage

पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा.

या संपूर्ण विश्वात आपल्याला जीवनाइतके दुसरे काहीही नाही. तरी-देखील थोड्याच व्यक्ती जीवनाचा सर्वांगीण विचार करणाऱ्या असतात. मानवी जीवनाचा काही हेतू आहे का? असल्यास ते ध्येय कसे प्राप्त करता येईल? आपल्या जीवनाचे सार्थक झाले, असे कोणाला आणि केव्हा वाटावे? असा प्रश्नांची उत्तरे ज्याची त्याने काढायची असतात. मानवी जीवन त्रिमितीय आहे. जीवनाला लांबी (वय), रुंदी (प्रकृती) आणि खोली (इतरांसाठी तुम्ही काय केले?) आहे. जीवनाच्या या तिन्ही मिती संतुलित असतील, तर त्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. जीवनाची लांबी म्हणजे आपले वय. अकाली मृत्यू येण्याने ते जीवन वाया जाते. पण केवळ दीर्घायू होण्याने जीवनाचे सार्थक होत नाही. 'किती जगलात हे महत्त्वाचे आहेच; पण कसे जगलात,' हे अधिक महत्वाचे ठरते. जीवनाची रुंदी म्हणजे माणसाची प्रकृती. केवळ आजार याचा अभावच नव्हे; तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक सुस्थिती म्हणजे आरोग्य ! अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आहे. संतुलित आहार, नियमाने केलेला व्यायाम, अंतर्बाह्य स्वच्छता, आजारांना प्रतिबंध आणि कोणत्याही विकाराचे लवकर निदान, योग्य उपचार आवश्यक असतात. मनाच्या गरजा पुरवणे, आनंदी वृत्ती जोपासणे, चौकस बुद्धीने निरीक्षण करीत राहणे, इतरांच्या गरजांची जाणीव ठेवणे, आपल्या आयुष्याचे ध्येय ठरविता येणे — अशा प्रकारांनी मानसिक स्वास्थ्य कमवावे लागते. आपण एका समाजाचे जबाबदार घटक आहोत याची जाणीव ठेवून आपल्याला सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडून सामाजिक प्रकृती सांभाळता येते.

शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक प्रकृती निकोप ठेवणे आवश्यक आहे. प्रकृती चांगली नसेल; तर या आयुष्यात जे काही करावयाचे आहे, जे ध्येय गाठावयाचे आहे, ते कोणीही मिळवू शकणार नाही. परंतु, केवळ प्रकृती चांगली ठेवली, एवढ्यानेच जीवन सफल झाले, असेही म्हणता येणार नाही.

जीवनाची तिसरी मिती म्हणजे इतरांसाठी तुम्ही काय केलेत, ही होय. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या सर्व गरजा पार पाडल्यावर, तुम्ही तुमच्या समाजासाठी काय केलेत, यावर ही मिती ठरते. माणसाचे खरे मोठेपण या तिसऱ्या मितीवर ठरते. अर्थातच, प्रकृती चांगली नसेल किंवा आयुष्यच थोटके पडल्यास, ही तिसरी मिती घडणे संभवतच नाही. यासाठी लांबी, रुंदी, आणि खोली या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तिघांकडे समप्रमाणात लक्ष देण्याने आयुष्य समतोल राहील, ते संतुलित होईल. एक आदर्श निर्माण होईल, असे आदर्श समाजापुढे यावयास हवेत. या आदर्शाची जडण-घडण पाहताना घडणाऱ्या व्यक्तिमत्वापुढे एक प्रेरणास्थान निर्माण होईल. एका पणतीने दुसरी पणती पेटू शकेल. अंधार जाऊन प्रकाश येईल.

लेखकाच्यामते जीवनाला प्रामुख्याने केव्हा अर्थ प्राप्त होतो?

1
आजारांना प्रतिबंध
2
तिन्ही मिती संतुलित असतील तर -
3
गरजा पूर्ण केल्यावर
4
अल्पायु झाल्यावर
5
यापैकी एकही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation