Comprehension Passage

​पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा.

आज अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ते वर कायम प्रश्न उपस्थित केले जातात त्याच शाळेचे शिक्षक श्री. रणजितसिंह डीसले गुरुजींनी "जागतिक शिक्षक पुरस्कार" मिळवला याचा अर्थ काळ बदलतोय जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा शिक्षणाचा दर्जा सुधारतोय हे आश्वासक उदाहरण आहे. यातून पालकांनी धडा घ्यावा पालकांनी मराठी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य द्यावे. ज्या पालकांना इंग्रजी भाषा चांगली लिहिता वाचता व बोलता येत असेल त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विचार केला तर तो त्यांचा निर्णय त्यांना आपण रोखू शकणार नाही.. अनेक शिक्षण तज्ञांनी सांगितले आहे कि मातृभाषेतून मुल लवकर शिकते. उच्च शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध नाही. खरं तरं, मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असावे. कारण लहानपणापासून शिकल्यामुळे आपले विचार व्यक्त करणे सोपे जाते. मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल. याचा अर्थ असा नाही की, परकीय भाषा शिकू नये, परकीय भाषा जरूर शिकाव्यात, या भाषांचा आदर करावा, पण आपण आपल्या भाषेच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना अन्य भाषांचा जराही द्वेष मनात येऊ न देता प्रतिआव्हाने निर्माण नाही का करू शकणार? आजचे युग हे माहिती - तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संपर्क - क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोट्या छोट्या कृतींनी काहीच नाही का करू शकणार? भाषेच्या जाज्वल्य नाही तरी किमान मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार? भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने नाही का सहकार्य करू शकणार? मला वाटतं की हे फारसं अशक्य नाही. उलट या कृतींनी आपल्यालाच 'अल्प योगदान' दिल्याचे समाधान लाभू शकेल. हा 'किमान भाषा वापर' असा कार्यक्रम नसून उलट किमान समान कार्यक्रमाच्या धर्तीवर आधारित 'भाषा संवर्धन आणि प्रसार कार्यक्रम' आहे. हल्ली सगळेकडेच इंग्रजी भाषेचा प्रसार झालेला आपल्याला दिसत आहे. असे असले तरी काही मराठी वृत्तपत्रे मराठी भाषेला प्राधान्य देऊन इंग्रजी शब्द टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वाचकांची मानसिकता लक्षात घेता हे इंग्रजी शब्द वाचकांच्या अंगवळणी पडल्याने वृत्तपत्रांना इंग्रजी शब्दांना उपयोग करणे भाग पडते. मराठी भाषा टिकली तरच समाज टिकेल आणि तरच येणारी पुढची पिढी टिकेल. आपली जडणघडण ही आपली बोली भाषेतूनच होत असते. लोकांचा असा समज आहे की परकीय भाषा आली तरच आपला विकास होईल. आपला खरा संबंध हा मातृभाषेशी असतो. मातृभाषा आपली आईच असते. या मातृभाषेचे संवर्धन आपणच केले पाहिजे असे मला वाटते. मुळात मराठी भाषा जतन करण्यापेक्षा समृद्ध केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण वाचन संस्कृती जपली पाहिजे.

डिसले गुरुजींना पुरस्कार मिळाला यातून काय सूचित होते?

1
किमान भाषा वापर कार्यक्रम यशस्वी होतोय.
2
काळ अपरिवर्तनीय आहे.
3
जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा वाढतोय.
4
इंग्रजी शब्दांचा वापर कमी होतोय.
5
यापैकी एकही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation