Comprehension Passage
आपलं सांगणं खूप लोकांना कळावं, ही ओढ माणसाला असते. लेखकाला ती अधिक असते. ज्याला काही सांगायचं असतं असा लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा वाचकाला आपण प्रिय व्हावं म्हणून न लिहिता ते त्याला कळावं म्हणून लिहितो. तिथं तो मग आपण लोकप्रियही व्हावं म्हणून तडजोड करत नाही. त्याचं म्हणणं कित्येकदा त्याचा समकालीन समाज स्विकारत नाही. पण समाजाला वर्तमानाची जाण असलीच लेखकमंडळी आणून देत असतात. साहित्याचा इतिहास वैभवशाली केला आहे, तो प्रत्येक काळातल्या वर्तमानाची जाणीव असलेल्या साहित्यिकांनी. पुष्कळदा अशा लेखकांच्या बाबतीत ते काळाच्या फार पुढे होते, असं म्हटलं जातं. वास्तविक ते त्या-त्या वेळच्या वर्तमानाबरोबर असतात. हरिभाऊ यमूचे हाल सांगत होते. ते त्यांच्या काळातल वर्तमान होतं, जोतिबा फुले ज्या वेळी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचं वर्णन करीत होते, ती त्यांच्या काळातली वर्तमान परिस्थिती होती. दुर्दैवानं पुष्कळशा प्रमाणात आजही ती बदलावी तितकी बदललेली नाही. आजचं वर्तमान हे भूतकाळाच्या कुठल्या चुकांची परिणती आहे, हे ध्यानात आल्यावर भूतकाळाचे नुसते गोडवे गात बसण्याला अर्थ राहत नाही.

लेखकाला सर्वाधिक ओढ कशाची असते?

1
आपलं सांगणं खूप लोकांना कळावं
2
वर्तमान जीवनात जगण्याची
3
भूतकाळाचे गोडवे गात बसण्याची
4
साहित्याचा इतिहास वैभवशाली करण्याची

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation