खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांच उत्तर द्या.
एक परिपूर्ण, वैज्ञानिक आणि प्राचीन खाद्य संस्कृती असलेला आपला देश हा जगाच्या पाठीवर एकमात्र आहे. खाद्य संस्कृतीच्या बाबतीत 'आहाराचा आणि शरीराचा, आहाराचा आणि मनाचा, आहाराचा आणि चित्त वृत्तीचा संबंध असतो' हे आपल्या पूर्वजांनी काही हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. तुम्हीं खाता त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्त्व घडतं. माणसाच्या आहारावर त्याची बुद्धिमत्ता, त्याचा स्वभाव आणि शारीरिक क्षमता अवलंबून असते. शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त करणे या दोनही गोष्टी आहाराच्याच आधीन आहेत. समाजातील आहार निरीक्षणाद्वारे, महाराष्ट्रीयन आहार सर्वात योग्य व संतुलित आहार आहे हे सिद्ध झालंय. ऋतु, हवामान आणि सणवाराला अनुसरूनच येथील लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी होत्या. वेगवेगळ्या रूढी, पद्धती, पूजा-पाठ यांना खाण्याचे नियम त्याकाळी जोडले गेले म्हणून ते पाळले तरी जात होते. पानांत पोळी, भात, वरण, भाजी, कोशिंबीर, दही व फळे, हे सर्व वाढायच्या पद्धती मागेही चांगलाच विचार दडलेला आहे तो म्हणजे गोड, तिखट, आंबट, खारट, कडू, तुरट अश्या षडरसांनी परिपूर्ण आपला आहार असावा. पूर्वी जे पहिल्या वाढीत ताटात येई ते सर्व खाण्याचा नियम होता. त्यामुळे संतुलित भोजनाचा मुलाबाळांनाही फायदा होत असे.