Comprehension Passage

निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:

1960-70 च्या दशकांत एकंदरीत जग भरातच अनेक ठिकाणी राजकीय पर्यावरण तापलेले होते. फ्रान्समधील विद्यार्थी कामगारवर्गासह रस्त्यावर उतरून राज्यसत्तेशी संघर्ष करत होते. अमेरिकेतील देश-विदेशी, काळे-गोरे तरुण व्हिएतनामला नामशेष करायला निघालेल्या सरकारचा कडवा निषेध करत होते. जपानमधील तरुणांमध्ये जरी राजकीय प्रवृत्तींचा प्रादुर्भाव नंतरच्या काळात झाला तरी नव-डाव्या विचाराने प्रेरित झालेले तरुण युद्धविरोधी भूमिका घेऊन आंदोलन करत होते. चीनमध्ये माओने सुरु केलेल्या अभूतपूर्व सांस्कृतिक क्रांतीचा नंतरचा प्रवास जरी संधिसाधू दडपशाहीने बाधित झाला असला तरीही सुरुवातीला तेथल्या तरुणांनी परिवर्तनाचा हा सांस्कृतिक पैलू उचलून धरला होता.

अशा या आंतरराष्ट्रीय राजकीय पर्यावरणात आपल्या देशातील राजकीय वातावरण जनचळवळीच्या दृष्टीने वेगवान बनत होते. स्वातंत्र्यानंतर जनसामान्यांच्या आशा-आकांक्षांना फुटलेले धुमारे कोमेजून जात होते. शहर औद्योगिक क्षेत्रात मंदीची प्रचंड लाट 1967 पासुनच घोंगावत होती. 1960-61 नंतर सुरू झालेल्या कृषी क्षेत्रातील हरितक्रांतीचा बहर ओसरू लागला होता. पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली जुलमी, शोषक जमीनदार विरुद्ध आदिवासींचा सशस्त्र लढा उभारणारी चळवळ पसरत होती. दलित पँथर्स, स्त्री-मुक्ती संघटना, युवक क्रांती दल, एक गाव - एक पाणवठा, लोकविज्ञान संघटना, पेवलो फ्रेरी यांच्या कॉन्शनटायझेशन पद्धतीचा अवलंब करणारा आणि विज्ञान विषयक शिक्षण देऊ पाहणारा होशंगाबाद सायन्स टीचिंग प्रोग्राम अशा संघटनांच्या चळवळी जोर धरत होत्या. मागोवा गटासारखा मार्क्सवाद मानणारा जहालमतवादी गट युवकांमध्ये, कामगारात आणि ग्रामीण भागात कार्य करू लागला होता. समाजवादी व कम्युनिस्ट विचारांचे पाच पक्ष एकत्र येऊन कामगार शेतकऱ्यांच्या लढ्याचे पुढारपण करत होते. मजूर संघर्ष वाहिनीचे व्यापक अस्तित्व जाणवत होते. जनसमुदाय हलत होते. उत्स्फूर्त तसेच संघटित लढे ठिकठिकाणी उद्भवू लागले होते. महागाई, गरिबी, दुष्काळ हे मुद्दे घेऊन अनेक ठिकाणी तीव्र संघर्ष छेडले जात होते.

महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील शहादे परिसरात धडाडीच्या आदिवासी तरुण अंबरसिंग सुरत वंती आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या रक्तात बुडवलेल्या लेखणीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना पत्र लिहून आदिवासी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध संताप व्यक्त केला होता. आदिवासी स्थानिक तरुण कार्यकर्ते त्यांच्याभोवती गोळा होऊ लागले. सर्वोदयचे नेते व कार्यकर्ते होतेच. लाल निशाण पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, त्यांचे नेते शहाद्याला येऊ लागले. बाबा आमटे यांच्या सोमनाथ च्या श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठातील तरुण कार्यकर्ते त्यांना येऊन मिळाले. डाव्या विचारांनी भारावलेल्या, ग्रामीण भागात चळवळ करू इच्छिणाऱ्या, काही शहरी मध्यमवर्गीय तरुणांनी शहादेव परिसरात कार्य करण्याचा निर्णय केला. 

नक्षलवादी असो, युवक क्रांती दल असो, दलित पँथर्स असो, किंवा मागोवा गट आणि त्यांच्याशी संबंधित शहरी-ग्रामीण भागात काम करणाऱ्या श्रमिक संघटना; त्यांच्या राजकीय-तात्विक रोख 'निवडणुकांच्या समन्वयवादी, संधीसाधू राजकारणामुळे परिवर्तनाच्या पायाभूत कार्याला खीळ बसत आहे', हा होता जरी या संघटनांमध्ये खूप राजकीय व वैचारिक मतभेद असले तरी या मुद्द्याबाबत त्यांची धारणा सारखीच होती. 

कामगार, शेतकरी, शेतमजूर, कारागीर, व्यावसायिक अशा श्रमिकांचे श्रमिक म्हणून असणारे प्रश्न घेऊन चळवळ करत असतानाच दलित, आदिवासी. भटके-विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक महिला अशा सामाजिक सामुहिक घटकांचे विशेष प्रश्न घेऊन मुद्दाम चळवळ करावी लागते.

अराजकीय प्रवृत्तीमध्ये पुढीलपैकी कोणती कृती समाविष्ट होत नसावी?

अ) राज्य सत्तेशी संघर्ष करणे

ब) युद्धविरोधी भूमिका घेणे

क) सांस्कृतिक परिवर्तन करणे

1
फक्त ब
2
अ आणि ब 
3
ब आणि क 
4
अ, ब, आणि क

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation