निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.
भारताच्या राजकीय फाळणीमुळे इतिहासातील सर्वात मोठा भीषण उद्रेक घडून आला होता. त्याआधी कधीही आणि त्यानंतरही कधी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांची घरेदारे आणि राष्ट्रीय सोडली नव्हती आणि तीही इतक्या कमी कालावधीत. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने फाळणीची ही बाजू अस्तित्वात आहे, परंतु फाळणीबद्दलचा महिला दृष्टिकोन मात्र सापडायला अवघड आहे. तो अस्तित्वात आहे, तो खाजगी चर्चेत, भारत आणि पाकिस्तान मधील अनेक घराघरात, ज्या गोष्टी सांगितल्या जातात आणि पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात, त्यांच्या तो अस्तित्वात आहे.
बुटलिया यांचा जन्म फाळणीतील विस्थापित कुटुंबात झाला. ते त्यांच्या पिढीतील इतर अनेक पंजाबी कुटुंबाप्रमाणे होते. त्यांनी फाळणीच्या आठवणी ऐकल्या, त्या काळातील थरार, त्यातील क्रौर्य त्यांच्या आईच्या तोंडून ऐकले जी लाहोर वरून आलेली होती. त्यांच्या आईने त्यांना दोनदा केलेल्या भयंकर प्रवासाविषयी सांगितले, जो त्यांनी त्यांचे भाऊ आणि बहिण यांना भारतात आणण्याकरता केला होता. परंतु सन 1984 पर्यंत बूटालिया यांच्याकरिता या केवळ लुटीच्या, जाळपोळीच्या, बलात्काराच्या आणि खुनाच्या केवळ गोष्टी होत्या.
ऑक्टोबर 1984 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून हत्या करण्यात आली. त्यानंतरच्या दिवसांमध्ये संबंध भारतातील शिखांवर हिंसा आणि बदला यांचे तांडव करत हल्ले केले गेले, अनेक घरे उद्ध्वस्त केली गेली आणि हजारो लोकांची हत्या करण्यात आली. अनेकदा अनेकांना रॉकेल शिंपडून जाळण्यात आले. बुटलिया त्या अनेक 'शे' लोकांमधील एक होत्या, ज्यांनी त्यातील पीडितांकरता अन्न, मदत, घर पुरवण्यासाठी काम केले. प्रत्येक दिवशी मृत्यू झालेले, बेपत्ता झालेले, आणि अत्यंत त्रासदायक अवस्थेतील लोक त्यांनी पाहिले.
हा तोच काळ होता जेव्हा बुटलिया यांना कळले की, फाळणीची वेदना आणि फाळणीच्या गोष्टी या आता काही फार लांबच्या दिसत नाहीत. त्याच खेड्यातील लोक, त्याच गावातील लोक हे अजूनही त्यांच्या धार्मिकतेचे, त्यांच्यातील मतभेदाचे, राजकारण करून फूटीला बळी पडू शकतात, आणि एकदा त्यांच्यात फूट पडली की ते एकमेकांबरोबर भयानक काहीतरी करू शकतात. या अत्याचाराच्या घटनेने त्यांच्यावर हे बंधनकारक केले की त्यांनी फाळणी मध्ये वाचलेल्या लोकांच्या कथा गोळा कराव्यात. त्यांच्यामध्ये हे जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत झाली की, महिलांनी बलात्कार आणि इतर अत्याचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी काय केले होते, आणि यातील काही कथा या इतक्या थरकाप उडवणाऱ्या होत्या की त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. या सर्वांचा परिणाम त्यांच्या फाळणी आणि महिला यांच्या मौखिक इतिहासाकडच्या प्रवासाची सुरुवात होण्याकडे झाला.