उतारा वाचून प्रश्नांची अचूक उत्तरे लिहा.
एस. एस. इस्मालिया या बोटीने आमचा प्रवास सुरू झाला. युद्धकाळात सैन्य घेऊन जाणार्या आगबोटींच्या सुरक्षिततेची अतोनात दक्षता घ्यावी लागत असे. सूर्यास्तापासून सूर्योदयानंतर एका तासापर्यंत कोणत्याच प्रकारचा प्रकाश डेकवर दिसता कामा नये. विडी सिगारेट ओढायची नाही , काडीसुद्धा पेटवायची नाही,असा सक्त हुकूम असे.आपल्याला कल्पना नाही येत, परंतु समुद्रावर जळत्या टोकाचा उजेड देखील सात मैलापर्यंत दिसू शकतो. शत्रूला ते नेम धरण्याचे उत्तम साधन असते, म्हणून धूम्रपानाला कडक बंदी होती. बोटीवर आमचा दैनंदिन कार्यक्रम ठरलेला असे.माइया ताब्यात असलेल्या जवानांची तपासणी करून घ्यायची, कोणी आजारी पडला तर त्याला वैद्यकीय मदतीसाठी पाठवायचे,त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ठीक आहे की नाही ते पहायचे,या गोष्टी मी करत असे.आम्ही सैन्यातले अधिकारी न्याहारीसाठी,जेवणासाठी एकत्र जमत असू. पत्ते खेळणे, गप्पागोष्टी करणे व डेकवर फिरणे हा आमचा ठराविक कार्यक्रम असे.सैनिकांच्या कार्यक्रमात दैनंदिन कवायत आणि दारूगोळा यावर सुसज्ज पहारा करणे ही कामे असत.वर निळे आकाश आणि खाली गहिरे पाणी असा हा प्रवास करत 6, 7 दिवसानंतर एकदाचे आम्ही एडनला पोहोचलो खरे ,पण सुएझ कालवा खूप अरुंद होता, म्हणून तिथे जाताना बोट हळूहळू जात होती.