Comprehension Passage

निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.

समजा जर आपल्याकडे असे यंत्रमानव असते जे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले अगदी यांच्या सारखे असते आणि आपल्या कायद्याने अशी परवानगी असते की आपल्याला हवे तशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांना कशी वागणूक द्याल? आणि हाच "वेस्टवर्ल्ड" या वरील लोकप्रिय मालिकेचा विषय आहे जिथे दुसरे पर्व रविवारी रात्री सुरू झाले. आणि, दुसऱ्या पर्वातील कथानकातील धक्के बाजूला ठेवले तर, ती असा नीतिविषयक मूलभूत प्रश्न उभा करते ज्याला आपण मनुष्यांना फार लांब नसलेल्या भविष्यात सामोरे जावे लागण्याची संभव आहे.

सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. आणि नक्कीच, यामुळे प्रेक्षक नेहमी गोंधळात पडतात किंवा चुकीच्या दिशेने जातात की कोण यजमान आहे आणि कोण व्यक्ती आहे. पाहुण्यांना ज्याने आनंद वाटेल असे ते वागू शकतात. त्यातले काही नायकाची भूमिका बजावतात, परंतु काही ही त्यांच्या काळ्याकुट्ट कल्पनांना वाट मोकळी करून देतात, आणि छळ, बलात्कार, आणि खून यात सहभागी होतात - ज्यात यंत्रमानवांचा खूनही समाविष्ट आहे हे जे मानवी मुलांपासून सहजासहजी वेगळे काढता येत नाहीत. यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

हे सांगणे थोडेसे मालिकेचे कथानक पोडल्यासारखे होईल की वेस्टवर्ल्ड मधील मनुष्याकरिता काही गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. परंतु आपण इथे या कार्यक्रमाच्या एकंदरीत आशय-विषयांमध्ये रस घेतो आहोत, आणि आपली या जिवंत भासत असलेल्या यंत्रमानवांवरची प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया मानवी स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांविषयी सुचवते. सर्वात मोठी काळजी म्हणजे कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू; संवेदनशील असलेले प्राणी ज्यांना श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. हे करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल असे दिसत नाही. तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक हे सांशक आहेत की तशी जाणीव ही जड जगापासुन निर्माण होईल, परंतु काहींचे म्हणणे असेही आहे की जाणीव असलेली यंत्रे निर्माण करणे शक्य आहे. समजा, की अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञ यांचा विश्वास आहे की, जाणीव ही आवश्यक तितक्या व्यामिश्र व्यवस्थेतून ती माहितीवर प्रक्रिया करते त्यातून निर्माण होते. त्यामुळे असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही की अशी व्यवस्था ही हाडामासाची असायला हवी.

खालीलपैकी कोण असा ठाम विचार करते की, जाणीव असलेल्या यंत्रांची निर्मिती शक्य आहे?

अ) वैज्ञानिक

ब) तत्त्वज्ञ

क) वरील उताऱ्याचा लेखक

1
फक्त क 
2
अ आणि ब 
3
अ, ब, आणि क 
4
यापैकी नाही 

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation