आधुनिक काळात सहकार हा जीवनाचा मार्ग झाला आहे. सध्याच्या स्पर्धेमध्ये सहकाराच टिकू शकते.
सहकारातुन बऱ्याच सहकारी संस्थानी उभारी घेतली आहे. त्या संस्थानी फार मोठा परिसर विकासाच्या क्षेत्रखाली आणला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उद्योग आणि सेवा या दोन्ही क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत.
सहकारी चळवळ ही देखील त्याला अपवाद राहणार नाही. म्हणून आपली सहकारी चळवळ दुर्बल बनता कामा नये, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. आपली ग्रामीण आणि कृषिप्रधान अर्थरचना सहकारी चळवळीमुळेच सशक्त बनू शकते आणि ही अर्थरचना सशक्त राहिली तरच भारतीय अर्थकारणाचा कणा मजबूत राहू शकतो. सहकारी क्षेत्रातील उणिवांकडे लक्ष दिले पाहिजे. सहकारी क्षेत्रातील काही घोटाळ्यांमुळे ती चळवळच पूर्णत: कुचकामी आहे असे समजणे दुदैवी ठरेल. सहकारी चळवळीतील उणिवा लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करणे अगत्याचे आहे. सहकारी चळवळीमध्ये नव्या युगाला पोषक बदल घडवून आणांवा लागेल. त्यासाठी त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतील. त्या सुधारणांसाठी स्वातंत्र्य देऊन नवीन दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. परिवर्तनाचे आव्हान स्वीकारले पाहिजे. आपणास प्रभावीपणे पेलेल अशी सहकारी तत्त्वांची भक्कम पायाची पुन:स्थापना केली पाहिजे.
सहकारी चळवळ ही नैतिक आणि आध्यात्मिक सदूगुणांवर उभारलेली चळवळ आहे. आज त्यातील नैतिक व आध्यात्मिक जाणिवांची दुर्बलता प्रकर्षाने जाणवत आहे. या क्षेत्रात ज्या महषींनी कार्य केले उदा. श्री. वैकुंठभाई मेहता, श्री. धनंजयराव गाडगीळ अशांची उणीव अद्याप भरून निघालेली नाही. या थोर विभूर्तींच्या प्रतिष्ठेला साजेल अशा नैतिक व बौद्धिक क्षमतेच्या व्यक्तींची आज नितांत गरज आहे. सहकार क्षेत्रात प्रगत आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आहे. सहकारी संस्थांना सामर्थ्य प्रदान करण्याची गरज आहे. बदलत्या
वातावरणात सहकारी चळवळ टिकावी, वाढीवी आणि तिला बलशाही रूप प्राप्त व्हावे म्हणून तिला सक्षम करण्याच्या उपायांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्या चळवळीचा त्याग करण्याची गरज नाही. प्रभावशाली यंत्रणा निर्माण करून त्या चळवळीला नवीन सैद्धांतिक मांडणी करण्याची संधी प्राप्त करून देण्याची गरज आहे.