निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:
व्यायामाचे महत्त्व कितीही प्रकारे समजावले तरी त्यासाठी तयार होण्यास माणसाला खूप जोर लावावा लागतो आणि आराम करण्यासाठी मात्र अजिबात प्रयत्न करावे लागत नाहीत. माणसाने निरोगी राहण्यासाठी दर आठवड्याला किमान दीडशे मिनिटांचा व्यायाम केला पाहिजे, असे गणित मांडले जाते. अमेरिकेसारख्या जागरूक देशातील निम्म्याहून अधिक लोक हे व्यायामाचे किमान निकष पाळत नाहीत. प्रवासाचा वेळ, थकवा, ताणतणाव आणि वेळेचा अभाव ही कारणे त्यासाठी सांगितली जातात.
डेव्हिड रॅचलन यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या चमूने टांझानियातील हाज्दा समाजातील लोकांचा अभ्यास डेव्हिड रॅचलन यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या चमूने सुरू झाला. (त्याचा शोधनिबंध काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे.) हा टांझानियातील हाज्दा समाज जगभरा जीवनशैली तील मानववंशशास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आदर्श अशा समुदाय आहे. कारण माणूस दहा हजार वर्षांपूर्वीची कृषी संस्कृती निर्माण होण्याच्या आधी ज्या अवस्थेत कंदमुळे शोधून आणि शिकार करून जगत होता तशीच या हाज्दा समाजाचीआजही आहे. आपल्या पूर्वजांची जीवनशैली नेमकेपणाने समजण्यासाठी या हाज्दा समाजाच्या जगण्याचा अभ्यास म्हणूनच अनेकदा केला जातो.
हे हाज्दा लोक दिवसाभरात अनेक मैल चालतात. त्यानंतरच त्यांना अन्न मिळू शकते. त्यामुळे, हे स्पष्ट आहे की आपण एक अशी जीवजात आहोत, जी केवळ अन्न प्राप्त करण्यासाठीच धावपळ करणार. आजच्या वर्तमानकाळात अशी धावपळ करण्याची गरज नसते. त्यामुळे, आपण नैसर्गिकरित्या व्यायाम करत नाही. कारण आपल्याला आता सहजपणे, साठवून ठेवलेले, घरपोच, खाली उतरले की मिळते, असे खाद्य उपलब्ध आहे. हाज्दा लोक हे कोणत्याही अपघाताने मरण पावले नाही तर ते दीर्घकाळ आणि निरोगी आयुष्य जगतात. त्याचे अजून एक कारण म्हणजे त्यांचा आराम आणि त्यांची शरीर कृती याचे एक समीकरण असते. ते आराम करतात, तेव्हा कधीही खुर्चीचा उपयोग करत नाहीत. ते जमिनीवर बसतात किंवा पायांवरच बसतात. जेणेकरून शरीर सक्रिय असते, ज्यामुळे हृदयविकार व अन्य विकारांना जन्म देणारे घातक घटक निर्माण होत नाहीत.
आराम करणेही उत्क्रांतीच्या दृष्टीने आवश्यकच असते. कारण कुपोषित परिस्थितीत किंवा मर्यादित ऊर्जा असलेल्या भागात तुम्ही विनाकारण धावपळ करून ती खर्ची घातली तर तुम्ही टिकू शकणार नाही. त्यामुळे, ऊर्जा साठवणे हीसुद्धा तितकीच महत्त्वाची, टिकून राहण्यासाठीची प्रेरणा आहे. म्हणून आपली आराम करण्याची प्रेरणाही तितकीच जोरकस असते. जोवर आपल्याला खाण्यापिण्याची मारामार करावी लागत नाही, तोपर्यंत आपण शरीराला आराम देऊन ऊर्जाबचत करतो. आपल्या बसण्याच्या पद्धती बदलल्या तर हे चित्र बदलेल का, यावर पुढील संशोधन हाती घेतले जात आहे. तोवर आपला व्यायामाशी संघर्ष जारी राहील.